October 2017

माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चार गुणवैशिष्ट्ये ज्या मनुष्यात असतील तो पक्का धर्मद्रोही असेल आणि ज्या मनुष्यात त्यापैकी कोणतेही एक गुणवैशिष्ट्य असेल तर त्याच्यात शत्रुत्वाचे एक गुणवैशिष्ट्य असेल, तर ते त्याने सोडून द्यावे. ती चार गुणवैशिष्ट्ये अशी आहेत- जेव्हा त्याच्याकडे एखादी ठेव ठेवण्यात आली तर त्यात अफरातफर करणे, खोटे बोलणे, वचन दिले तर ते न पाळणे आणि जेव्हा त्याचे कुणाशी भांडण झाले तर शिवीगाळ करणे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत मोठा खोटारडेपणा म्हणजे मनुष्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना ती गोष्ट दाखवावी जी त्या दोन्ही डोळ्यांनी पाहिली नसेल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : म्हणजे त्याने कसलेही स्वप्न पाहिले नाही परंतु जागा झाल्यानंतर अतिशय मजेदार व चांगल्या गोष्टी सांगतो, म्हणतो की हे मी स्वप्नात पाहिले आहे, असे करणे म्हणजे आपल्या डोळ्यांद्वारे खोटे बोलविणे होय.
माननीय असमा बिन्ते उमैस (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका पत्नीला घेऊन त्यांच्या घरी गेलो. जेव्हा आम्ही पैगंबरांच्या घरी पोहोचलो तेव्हा पैगंबरांनी दुधाचा एक ग्लास काढून आणला, मग त्यांनी आपल्या इच्छेनुसार प्यायले आणि त्यानंतर आपल्या पत्नीला दिला. त्या म्हणाल्या, ‘‘मला इच्छा नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही भूक व खोटारडेपणाला एकत्र करू नका.’’ पैगंबरांना जाणवले की आपल्या पत्नीला भूक लागलेली असूनदेखील त्या औपचारिकपणा दाखवित आहेत, म्हणून पैगंबरांनी खोट्या औपचारिकपणा दाखविण्यास मनाई केली आहे. (हदीस : मुअजम सगीर तिबरानी)
माननीय सुफियान बिन असीद ह़जरमी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आपल्या बंधुला एखादी गोष्ट सांगितली आणि त्याने तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, मात्र तुम्ही जी गोष्ट त्याला सांगितली ती खोटी होती, हा फार मोठा अप्रामाणिकपणा आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
माननीय अब्दुल्लाह बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) आमच्या घरी आले होते तेव्हा माझ्या आईने मला बोलविले, ‘‘इकडे ये! मी तुला एक वस्तू देईन.’’ तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘तुम्ही त्यांना काय देऊ इच्छिता?’’ आई म्हणाली, ‘‘त्याला खजूर देऊ इच्छिते.’’ पैगंबरांनी आईला म्हटले, ‘‘जर तुम्ही देण्यासाठी बोलविले आणि दिले नाही तर तुमच्या कर्मपत्रात हा खोटारडेपणा लिहिला जाईल.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : सर्वसामान्यपणे आई-वडील आपल्या मुलांशी असे वागतात की काही देण्याच्या बहाण्याने बोलवितात, मात्र देण्याची इच्छा नसते, तेव्हा हा अल्लाहपाशी खोटारडेपणा ठरेल. कर्मपत्रात हा खोटारडेपणाच्या यादीत लिहिला जाईल.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) सांगतात, खोटे बोलणे कोणत्याही स्थितीत वैध नाही, न गंभीरपणे आणि न गंमत म्हणून. आणि हेदेखील वैध नाही की तुमच्यापैकी कोणी आपल्या मुलाला एखादी वस्तू देण्याचे वचन द्यावे आणि ते पूर्ण न करावे. (हदीस : अल अदबुल मु़फरद, पृष्ठ ५८)
माननीय बह़ज बिन हकीम (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्दशा व दुर्दैव आहे त्या मनुष्याकरिता जो लोकांना हसविण्यासाठी खोटे बोलतो, दुर्दशा आहे त्याच्याकरिता, दुर्दशा आहे त्याच्याकरिता.’’ (हदीस: तिर्मिजी)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये त्या लोकांना सावध करण्यात आले आहे जे बोलताना काही खोट्या गोष्टींचा समावेश करून तीखट-मीठ लावून मजेदार बनवितात आणि त्यापासून आनंद घेतात.
माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सत्यावर दृढ असणाNया मनुष्याने धर्माच्या बाबतीत वादविवाद न घातल्यास मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या कोपNयांत एका घराची जबाबदारी घेतो, आणि जो खोटे बोलणार नाही, मग ते हसण्याच्या स्वरूपात का असेना; मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या मधोमध एका घराची जबाबदारी घेतो आणि जो आपल्या नीतीमत्तेत सुधारणा घडवील, मी त्याच्यासाठी स्वर्गातील सर्वांत वरच्या भागातील घराची जबाबदारी घेतो.’’ (हदीस : अबू दाऊद)

(२२८) ...आणि याबाबतीत स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्क आहे परिचित पद्धतीनुसार जसे पुरुषांचे हक्क त्यांच्यावर आहेत. मात्र पुरुषांसाठी स्त्रियांपेक्षा एक दर्जा अधिक आहे आणि अल्लाह सर्वांवर प्रभुत्वशाली, विवेकी आणि ज्ञाता आहे.
(२२९) तलाक दोन वेळा आहे नंतर स्त्रीला  एकतर सर्वसंमत पद्धतीने आपल्याजवळ ठेवून घ्या किंवा सन्मानपूर्वक तिला  निरोप द्या.२५० आणि तुमच्यासाठी हे वैध नाही की जे काही तुम्ही त्यांना दिले आहे त्यातून काहीही परत घ्यावे. २५१ अपवाद फक्त जर त्या दोघांना भय वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे ते पालन करू शकत नाहीत. नंतर जर तुम्हाला भय वाटत असेल की ते दोघे अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांवर कायम राहू शकत नसतील तर त्यांच्यामध्ये असा समेट घडविण्यामध्ये कोणताही अपराध नाही की पत्नीने आपल्या पतीला प्रतिदान देऊन स्वत:ला मुक्त करून घ्यावे.२५२ या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि जे अल्लाहच्या मर्यादाचे उल्लंघन करतील तेच अत्याचारी आहेत.

250) अरब अज्ञानता काळात पती आपल्‌या पत्नीला अनेक तलाक देत असे. ज्‌या स्त्रीशी तिचा पती नाराज झाला तर तिला तो पुन्हा पुन्हा तलाक देऊन समेट (रुजू) घडवून आणत असे, जेणेकरून ती बिचारी पतीबरोबरसुद्धा राहु शकत नसे की पूर्ण मुक्त होऊन दुसऱ्याशी निकाहसुद्धा करू शकत नसे. कुरआनची ही आयत याच अत्याचाराचे दार बंद करते. या आयतच्‌या प्रकाशात एक पती आपल्‌या पत्नीला जास्तीतजास्त दोनदाच रजई तलाक देऊ शकतो. अशी तलाक की ज्‌यानंतर समेट होऊ शकतो म्हणजे पुन्हा पत्नी म्हणून राहु शकते चा अधिकार वापरु शकतो. जो मनुष्‌य आपल्‌या पत्नीला दोनदा तलाक देऊन तिच्‌याशी समेट करतो, तो आपल्‌या आयुष्‌यात जेव्‌हा कधी तिला तिसरा तलाक देतो तेव्‌हा पत्नी त्याच्‌यासाठी कायमचीच वेगळी होते.
तलाक देण्याची योग्य पद्धत जी कुरआन आणि हदीसनुसार आहे ती म्हणजे पत्नीला मासिकपाळी व्‌यतिरिक्तच्‌या काळात एक तलाक दिला जावा. एक तलाक दिल्‌यानंतर जर त्याची इच्‌छा असेल तर दुसऱ्या पाळीनंतर दुसऱ्यांदा एक तलाक द्यावा. अन्यथा योग्य हेच आहे की पहिल्‌याच तलाकवर थांबावे. या स्थितीत पतीला हा अधिकार राहातो की इद्दत (तलाकनंतरचा कालावधी) संपण्यापूर्व जेव्‌हा वाटेल समेट (रुजू) करावा आणि ईद्दतकाळ संपला तरी दोघांच्‌यासाठी संधी उपलब्‌ध असते की पुन्हा परस्पर सहमतीने पुन्हा निकाह करावा. परंतु तिसऱ्या वेळी तिसऱ्या पाक (स्वच्‌छ) स्थितीत तिसऱ्यांदा तलाक दिल्‌यानंतर मात्र पतीला समेटाचा अधिकार राहात नाही आणि दोघांचा पुन्हा निकाह करण्याची संधी बाकी राहात नाही. एकाच वेळी तीन तलाक देण्याची आजकालच्‌या अडाणी लोकांची प्रथा शरियतनुसार मोठा भंयकर गुन्हा आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी याविरुद्ध कडक शब्दांत निंदा केली आहे. आणि माननीय उमर (रजि.) तर एकाच वेळी तीन तलाक देणाऱ्याला कोडे मारण्याची शिक्षा देत असत.
251) म्हणजे महर आणि दागदागिणे, कपडे इ. पती आपल्‌या पत्नीला दिले तर त्यातील कोणतीही वस्तू परत घेण्याचा अधिकार त्याला नाही. ही गोष्ट इस्लामच्‌या नैतिकतेच्‌या विरुद्ध आहे की एखादी वस्तू जी त्याने दुसऱ्याला देणगी (हिबा, हदीया) रुपात भेट दिली असेल तिला पुन्हा परत मागावे. या हीन कार्याला हदीसमध्ये त्या कुÍयाची उपमा दिली आहे जो स्वत: केलेल्‌या उलटीला चाटतो. खासकरून एक पतीसाठी तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की त्याने तलाक दिल्‌यावर तलाक पश्चात पत्नीला निरोप देतांना त्या वस्तू परत मागाव्‌यात ज्‌या त्याने तिला दिल्‌या होत्या. याउलट इस्लामने ही शिकवण दिली आहे की तलाकपश्चात पत्नीला निरोप देतांना आणखी काही द्यावे. जसे पुढे आयत नं. 241 मध्ये स्पष्ट केले आहे.
252) शरियतमध्ये यास "खुलअ' म्हणतात. म्हणजे पत्नीने आपल्‌या पतीला काही देवून तलाक देणे होय. याविषयी पत्नी आणि पतीदरम्यान घरातल्‌या घरात मामला निश्चित झाला असेल तर त्यानुसार कार्यवाही होईल. परंतु जर न्यायालयात मामला गेला तर न्यायालय या गोष्टीचा शोध घेईल की खरोखरच या स्त्रीला आपल्‌या पतीची इतकी घृणा आहे की यापुढे दोघांचा निभाव लागणे अशःय आहे. याची पडताळणी झाल्‌या वर न्यायालय परिस्थितीनुरुप जो काही फिदीया (रक्कम) तजवीज करील ती फिदया रःकम देवून पत्नी आपल्‌या पतीपासून विभक्त होते. फिकाहशास्त्रींना बहुतेक मान्य नाही की जो माल पतीने त्या पत्नीला दिला होता त्यास परत घेताना जास्त काही देण्यात यावे.
"खुलअ'च्‌या स्थितीत जो तलाक दिला जातो तो रजई नव्‌हे तर बाईना आहे. म्हणजे पती समेट (रुजू) करु शकत नाही परंतु दोन्हींच्‌या सहमतिने निकाह होऊ शकतो.

एम.आर.शेख
9764000737

मनफियत एक है इस कौम के नुकसान भी एक
एक ही सबका नबी दिन भी ईमान भी एक
हरमे पाक भी अल्लाह भी कुरआन भी एक
कुछ बडी बात थी होते जो मुसलमान भी एक
म्यानमारमधून जेव्हापासून रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारासंबंधी बातम्या येत आहेत तेव्हापासून उम्मते मुस्लेमा (जागतिक मुस्लिम समुदाय) अस्वस्थ दिसून येत आहे. हिंदुस्तानपासून ते तुर्कस्तानपर्यंत, इंडोनेशियापासून ते इथोपियापर्यंत सगळे मुस्लिम एका सुरात बोलत आहेत. म्यानमार सरकारवर टिका करत आहेत. म्यानमारच्या प्रधानमंत्री आन सान सू की यांना मिळालेला नोबेल पारितोषिक परत घेण्याची मागणी करीत आहेत. मुस्लिम समाजाच्या या अस्वस्थतेकडे पाहून असे वाटत आहे की, जणू सकल मुस्लिम समाज हा एक आहे. यांच्यामध्ये जबरदस्त युनिटी (एकता) आहे. हे सत्य आहे मात्र अर्धसत्य. जेव्हा-केव्हा मुस्लिम समाजावर मोठी आपत्ती येते तेव्हा हा समाज एक संघ वाटायला लागतो. मात्र इतर वेळी हा समाज अतिशय विखुरलेला असल्याचे सत्य लपवता लपत नाही. इतर वेळी तू शिया मी सुन्नी, तू तब्लीगी मी बरेलवीमध्ये हा समाज विखुरलेला असतो. तो एकमेकांच्या इतका विरोधी होवून जातो की एकमेकांना काफिर (धर्मभ्रष्ट) सुद्धा म्हणायला  मागे पुढे पाहत नाही. प्रसंगी हाणामारी करायला मागे पाहत नाही. यांच्यातील फूट  निवडणुकीच्या काळात चव्हाट्यावर येते. निवडणुकी दरम्यान छोट्या-छोट्या गोष्टीवरून एकमेकांना चाकूने भोसकण्यापर्यंत मजल जाते. मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये एकेका सीटवर 20-20 मुस्लिम उमेदवार उभे होतात. एकमेकांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे इतकेच नव्हे तर एकमेकांच्या विरूद्ध फौजदारी खटले दाखल करण्यापर्यंत यांची मजल जाते. 
असे बिल्कुल नाही की मुस्लिमांना एकतेचे महत्व कळत नाही. मुस्लिम साहित्यामधून, मुस्लिम प्रेसमधून, एवढेच नव्हे तर गल्ली बोळातून होणार्या चर्चेतून, मुस्लिम आपसात एकतेचे महत्व एकमेकांना सांगत असतात. शुक्रवारच्या विशेष नमाजच्या वेळी केल्या जाणार्या विशेष संबोधनामधून उलेमा एकतेचे महत्व सतत अधोरेखित करत असतात. इक्बालपासून ते आजच्या मुशायर्यामधून उर्दू कवी एकतेचे महत्व वेगवेगळ्या उदाहरणातून समर्थपणे पटवून देतात. तरी परंतु, जेव्हा कुठै स्वार्थ आडवा येतो तेव्हा मुस्लिमांमधील फूट अटळ होवून जाते. इस्लाम आणि मुस्लिमांचा विरोध दारू विकणार्यांनी, सिनेमावाल्यांनी, सिरियल्सवाल्यांनी, फॅशनवाल्यांनी तसेच इतर वाईट गोष्टींचा व्यापार करणार्यांनी केला तर तो लक्षात येण्यासारखा आहे. कारण जेव्हा मुस्लिम लोक समाजातील वाईट प्रवृत्तींच्या विरोधात उभे राहतात तेव्हा प्रस्थापित लोक त्यांचा विरोध करतातच. मात्र मुस्लिमच जेव्हा मुस्लिमांचा विरोध करतात, तो ही जमातवादातून, तेव्हा मात्र हा विरोध दुर्देवी असल्याचे लक्षात येतेे. 
मुस्लिम उम्मत ही जागतिक स्तरावर अनेक गटामध्ये विभागलेली आहे. प्रत्येक गटाला वाटते की आपलाच गट खरा इस्लामी गट आहे. आपणच जन्नतमध्ये जाणार, बाकीचे सगळे दोजखमध्ये जातील. इथपर्यंतही प्रत्येक गटाचा विचार असेल तरीही तो मतभेद म्हणून स्विकारता येईल. मात्र हे गट एकमेकांना शत्रुस्थानी समजतात व एकमेकांचा नायनाट करण्यासाठी शस्त्र हातात घेतात. तेव्हा मात्र यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. जोपर्यंत मुस्लिम समाज एक मुस्लिम उम्माह म्हणून आपसातील मतभेदासह सहअस्तीत्वाच्या तत्वावर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत आपसातील फूट नष्ट होणार नाही. 
फिरकाबंदी है कहीं और कहीं ़जातें हैं
क्या ़जमाने में पनपने की यही बातें हैं
 सामान्य मुस्लिमांचा असा समज आहे की, समाजामध्ये एकता निर्माण करण्याची जबाबदारी उलेमांची आहे आणि उलेमांना असे वाटते की समाजातील लोक अशिक्षित, अर्धशिक्षित असल्याने एकतेचे महत्व ते समजू शकत नाहीत. याच कारणाने आपसात एकी निर्माण होत नाही. बेकी मात्र भरपूर निर्माण होते आणि मग कधी गुजरातचे दंगे होतात तर कधी मुजफ्फरनगरचे. अशा दंगलीमध्ये सापडणारे जीव होरपळून जातात. आपसात एकी नसल्यामुळे बाकीचे लोक नुसते पाहत राहतात. म्हणून एकी निर्माण करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. सामान्य माणसाचीही आहे, उलेमांचीही आहे, एवढेच नव्हे तर मुस्लिम बुद्धिवादी लोक, प्रेस, साहित्यकार, शायर, कवी आणि श्रीमंत लोकांची म्हणजे सर्वांचीच आहे. एकीमुळे सामान्य माणसांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे हिम्मत वाढते. जर हे काम आपण करू शकलो नाही तर अगोदरच राजाश्रय नसल्यामुळे सैरभैर झालेला हा समाज आपसातील मतभेदांमुळे अधिकच कमकुवत होईल, यात शंका नाही 
खरे पाहता मतभेद तर जीवंतपणाचे लक्षण आहे. इस्लाम हा बुद्धिमान लोकांचा धर्म आहे. म्हणून या धर्मातील लोकांमध्ये मतभेद होणे नैसर्गिक बाब आहे. धार्मिक गोष्टींमध्ये विचार करणे, चिंतन, मनन करणे याच्यातून आपसात मतभेद तर होणारच. मात्र हे मतभेद सकारात्मक हवेत, याचीही समज समाजात नसणे हे आपले खरे दुखणे आहे. आपण मतभेद करणार्यांना शत्रूस्थानी समजतो. ही चूक जोपर्यंत आपण दुरूस्त करणार नाही तोपर्यंत मुस्लिम समाजाचा विकास होणार नाही. शेवटी अल्लाहने या समाजाला जगाचे नेतृत्व करण्यासाठी जन्माला घातलेले आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वैचारिक कुवत व त्या सोबत विरोधकांचा सन्मान या दोन गोष्टींची जाणीव असणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. एकमेकांच्या मतभेदांचा आदर करत जीवन जगणे हेच यशाचे सुत्र आहे. आम्ही कितीही गटा तटात विभागलेलो असू तरी शेवटी मुस्लिम आहोत. या एकाच मुद्यावर आपण एकत्र राहू शकतो. आज समाजामध्ये आपण पाहतो की एकमेकांबद्दल आदर राहिलेला नाही. एकमेकांच्या अधिकारांची जाणीव राहिलेली नाही. याबाबतीत यहुदी समाजाकडून शिकण्यासारखे आहे. जगातील सर्वात एकसंघ समाज यहुदी समाज आहे. जगात कुठेही यहुदी कुटुंबामध्ये मूल जन्माला आले तर जन्मताच त्याला इजराईल या देशाचे नागरिकत्व व त्यासोबत इजराईली नागरिकाला मिळणारे सर्व अधिकार प्राप्त होतात. त्याच्या संगोपनासाठी इजराईल सरकार मदत करते. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजात काय होते यावर भाष्य करण्याची गरज नाही. 
आम्हाला शांतचित्ताने विचार करावा लागेल. आज सामुहिक कल्याणासाठी परस्पर विरोधी विचार असणारे सेना/भाजप, बीएसपी/ भाजप, काँग्रेस/ राष्ट्रवादी एकत्र येवून एकमेकांचा विकास करतात. तर मग समाजाच्या कल्याणासाठी बरेलवी/तबलिगी, शिया/सुन्नी हे एकत्र का येवू शकत नाहीत. आपण एकत्र नसल्यामुळे म्यानमारसारखा दरिद्री देश सुद्धा मुस्लिमांचा वंशविच्छेद करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. इजराईल सारखा छोटा देश गाजामध्ये राहणार्या 20 लाख पॅलेस्टिनींना चोही बाजूंनी घेरून त्यांच्या भूमीचे जेलमध्ये रूपांतरण करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. इजिप्तमधील एक मिलिट्री अधिकारी आपल्याच देशाच्या निर्वाचित राष्ट्रपतीला जेलमध्ये टाकण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. आम्ही एकसंघ नाहीत म्हणूनच अफगानिस्तान, इराक आणि सीरिया उध्वस्त झालेले आहेत. पेट्रोलसारखी शक्ती पायाखाली असताना सुद्धा मुस्लिम राष्ट्र अमेरिकेपुढे लटलटा कापतात. आम्ही एकसंघ नाही म्हणूनच आयएस सारखी इजराईल समर्थक आतंकवादी संघटना खिलाफतीच्या नावाखाली मुस्लिमांना मुर्ख बनविते. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या मतभेदांमुळेच आपला विनाश होत आहे. 
आज भारतामध्ये दरवर्षी कोट्यावधी रूपयांची जकात काढली जाते. पण त्याचा म्हणावा तसा लाभ समाजाला मिळत नाही. 70 वर्षात आपण जकातीची एक परिणामकारक व्यवस्था उभी करू शकलो नाही. माझ्या मते इदुल इजहाच्या दिवशी देशभरात कुर्बानी केेलेल्या जनावरांची चामडी जरी एकत्रित करून विकली तरी दरवर्षी एक डीम्ड युनिव्हर्सिटी मुस्लिम समाज उभारू शकतो. मात्र आपल्यामधील मतभेदामुळे संघटन होवू शकत नाही आणि त्यामुळे कोणतेच भरीव काम होवू शकत नाही. 
कोणत्याही समाजासमोर जोपर्यंत एखादा महान उद्देश्य त्याचे नेतृत्व ठेवत नाही. तोपर्यंत तो समाज एकत्रित येत नाही. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे नेतृत्वाच्या अभावामुळे समाजासमोर कुठलेच महान उद्देश्य ठेवता आलेले नाही. म्हणून रोज कोट्यावधी तरूणांचे अब्जावधी मानवी तास व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकवर बेकार गोष्टी इकडून तिकडे करण्यामध्ये वाया जात आहेत. याची कोणाला काळजी नाही. एकतेचे महत्व सगळ्यांना माहित आहे. सगळे एकत्र सुद्धा होवू इच्छितात. परंतु आपल्या छोट्या-छोट्या नफ्सानी ख्वाहिशात (इच्छा, आकांक्षा)च्या पूर्तीच्या मागे आपण लागतो आणि त्याच्यातच आपले दिवस निघून जातात. मग झूठी शानो शौकत दाखविण्यासाठी मोठ-मोठी लग्ने, मोठ-मोठे वलीमे केले जातात. मग त्यासाठी प्रसंगी कर्जसुद्धा काढले जातात. जोपर्यंत आपण सर्व आपल्या इच्छा आकांक्षांना बाजूला सारून समाजकल्याणाच्या मोठ्या उद्देशासाठी एकत्र येणार नाही. तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नाही. यासाठी एक छोटी ट्रिक मी आपल्याला सांगतो. दुसर्यांचा हक्क देतांना थोडेशे जास्त देण्यासाठी राजी व्हा व आपला हक्क घेताना थोडासा कमी घेण्यावर राजी व्हा मग पहा समाजामध्ये किती सुंदर वातावरण निर्माण होते. म्हणून शेवटी एवढेच सांगून थांबतो की, उलेमा, वकील, श्रीमंत, बुद्धीवादी आणि सामान्य माणूस आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एकतेने राहण्याचा निश्चय करा. 
मुत्तहिद होंगे तो बन जाओगे खुर्शिद-ए- मुबीन
वर्ना इन बिखरे हुए तारों से क्या बात बने
जर आपल्याला हे करण्यात अपयश आले तर लक्षात ठेवा अंगमेहनत करण्यासाठी मजुरांची गरज प्रत्येक समाजाला नेहमीच असते. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, हे अल्लाह! आम्हाला एकसंघ राहण्याची समज दे. आमीन.

सय्यद सालार पटेल
9225525921

इस्लामचा शाब्दिक अर्थ आज्ञापालनार्थ मान तुकविणे व स्वत:ला स्वाधीन करणे असा होतो. जेव्हा हा शब्द विशिष्टपणे अल्लाहच्या हुजूरात विनम्र होणे होय. आपल्या स्वत:ला त्याच्या स्वाधीन करणे असा होतो. दिव्य कुरआनने आपल्यासाठी प्रस्तुत केलेली जीवनपद्धती इस्लामने घोषित केली आहे.

अखिल मानवजातीचा धर्म पहिल्या मानवापासून नेहमी इस्लाम (अल्लाहची पूर्णपणे आज्ञाधारकता) राहिला आहे. पवित्र कुरआनने आपले आवाहन व आपला दीन (धर्म/ जीवन पद्धती) प्रेषित मुहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्या वंश व राष्ट्राशीं संबंधित केलेले नाही. जीवनाचे प्रामुख्याने चार भाग केलेले आहेत. एक श्रद्धा व धारणा दूसरे उपासना विधी, तीसरे नैतिकता व चौथे मानवी व्यवहारासंबंधी नियम, मार्गदर्शन व आदेश.
इस्लामची नैतिकता धर्माचा सार आहे. मन मोहक आहे. मानवी वर्तनाशी साजेसे आहे, जोडलेले आहे. त्याच्या शिवाय मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होवू शकत नाही किंवा चांगल्या समाजाची कल्पनासुद्धा करता येत नाही.
 1. अल्लाहची बंदगी - ज्या नैतिक मुल्यांची जोपासना इस्लाम करू पाहतो त्यात सर्वप्रथम स्थान अल्लाहची बंदगी, भक्ती, उपासना, आराधना आज्ञाधारकाता व प्रार्थना आहे.
नैतिक मुल्यांचा स्त्रोत अल्लाहच्या बंदगीत दडलेला आहे. कुरआन हा ग्रंथ व पैगंबराचे आवाहन जगवासियांसाठी स्पष्ट आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’लोक हो! बंदगी (आज्ञाधारकता) करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्यांनाही निर्माण केले. जेणे करून तुम्ही (दुष्कृत्यापासून) परावृत्त राहू शकाल. (कुरआन : 2 : 21.)
2) आई वडिलांशी सद्वर्तन - अल्लाहच्या इबादतीनंतर इस्लामने आई-वडिलांशी सद्वर्तनला सर्वात महत्त्वाचे स्थान दिले आहे. पवित्र कुरआनात वारंवार आई-वडिलांशी सद्वर्तनाची ताकीद करण्यात आलेली आहे. ”तुझ्या पालनकर्त्याने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही भक्ती करू नये परंतु फक्त त्याची. आई-वडिलांशी सद्वर्तन करा जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होवून राहिले तर त्यांच्यासमोर ’ब्र’ शब्द देखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तर देखील देऊ नका तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला आणि नरमी व दयाद्रतेने त्यांच्या समोर नमून रहा आणि प्रार्थना करीत जा की हे पालनकर्त्या त्यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे त्यांनी दया व वात्सल्याने बालपणी माझे संगोपन केले.” (कुरआन : 17:23:24).
3) अल्लाहच्या मार्गात खर्च करणे : अल्लाहच्या मार्गात खर्च करणे याचा अर्थ असा की अल्लाहच्या आज्ञापालनेत, त्याची प्रसन्नता प्राप्त व्हावी यासाठी अखिल मानवाच्या कल्याणार्थ केला जाणारा धन क्षमता, बुद्धी कौशल्य, ज्ञानाचा केला जाणारा उपयोग.
जकात हे इस्लामचे दूसरे स्तंभ आहे. ज्यावर इस्लामी जीवन शैली उभी आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात सदका, फित्रा आणि जिलहज्जच्या महिन्यात कुर्बानी करून समाजसेवा केली जाते. शिवाय जेंव्हा ईशप्रसन्नतेची संधी प्राप्त होईल त्यावेळी मनुष्याने आपली शक्ती खर्च करावी हे दान तर खर्या अर्थी फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि ज्या लोकांसाठी आहे ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच ते मान सोडविणे - गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व अल्लाहच्या मार्गात आणि वाटसरूच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्व काही जाणारा दृष्टा व बुद्धीमान आहे. (कुरआन 9:61).
4) अश्लीलतेपासून दूर रहाणे : अश्लीलता माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. मनुष्य व जनावरांमध्ये फरक माणुसकीचा आहे. इस्लामने अश्लीलतेला निषिद्ध अवैध ठरवले आहे. व्यक्ति, वंश व समाजाचे पावित्र्य व आबरू राखण्यासाठी अश्लीतेच्या जवळ सुद्धा फिरकू नका असे कुरआनात स्पष्ट सांगितलेले आहे. ’अश्लील गोष्टीच्या जवळपास देखील फिरकू नका. मग त्या उघड असोत अथवा गुपीत.’ (कुरआन 6:51) वंश व कुटुंब व समाज नष्ट करावयाचे असेल तर अश्लीलतेच समर्थन करावे.
6) मानवी जीविताची हत्या करणे निषिद्ध : मानवी जीवाची हत्या निषिद्ध केली गेली आहे. ईश्वरानंतर मानवाचे स्थान आहे. एकाचे जीव वाचविणे म्हणजे समस्त मानवजातीचे प्राण वाचविणे आहे. कुराणच्या शिकवणी तर स्पष्ट आहेत. ’ कुरआनम्धये ठिकाणी म्हटलेले आहे की, ’ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्या व्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले त्याने सर्व मानवतेला ठार केले आणि ज्याने कोणाला जीवदान दिले त्याने जणूकाही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.’ (कुरआन 5:32).
7) अनाथांच्या संपत्तीजवळ जाऊ नका : अनाथाचे पालन पोषण, शिक्षण, संवर्ध करणे नातेवाईकांचे, कुटुंबाचे, समाजाचे शेवटी शासनाचे कर्तव्य आहे. जर त्यांची वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्याचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य ठरते. ’आणि अनाथांच्या संपत्ती जवळ जाऊ नका. परंतु, अशा मार्गाने जो योग्य असेल येथ पावेतो की तो प्रौढत्व गाठील’ (कुरआन 6:152).
8) वचनाचे पालन : वचनाला महत्व आहे, वचनाशिवाय माणुसकीची कल्पना सुद्धा करता येत नाही. समाजाचे स्थैर्य वचनपुर्तीवर अवलंबून आहे. कुरआनने विस्तृत अशी व्यवस्था केली आहे. मानव आणि अल्लाह, मानव आणि मानव, मानव आणि सृष्टी यात वचनपालनाचा करार झाला आहे. मनुष्याने तो शेवटपर्यंत पाळला पाहिजे. कुरआनमध्ये ठिकठिकाणी स्पष्टपणे उच्चारले आहे’ वचनाचे पालन करा. नि:संशय वचनाबद्दल तुम्हाला जाब द्यावा लागेल. (कुरआन : 17:34).
8) वजन मापे न्यायपूर्ण रितीने करणे : सामाजिक स्थैर्यासाठी समाजात नैतिकतेची व कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य आहे. ज्यातून विकास साधला जावू शकतो. कुरआनने वजन, मापे याच्यामध्ये प्रामाणिकतेला महत्व दिलेले आहे. याच  कारणाने तराजुची दांडी न मारणे अशी शिकवण दिली आहे. प्रामाणिकपणावर एका समाजाची निर्मिती करून शासन सुद्धा करण्याचे पुरावे प्रेषितांच्या काळात आढळून येतात. कारण कुरआनने स्पष्टपणे बजावले होते, ’ वजन- माप न्यायपूर्ण रितीने करा. तराजुची दांडी मारू नका. (कुरआन : 55:9).
9) अज्ञान मुलक : भ्रामक कल्पनाचे अनुसरण न करणे  :कुरआनने ज्ञानाविना केवळ अनुमान व तर्क अथवा भ्रामक कल्पना किंवा इच्छा आकांक्षावर आपली इमारत उभी केली नाही तर फक्त ज्ञानावर केलेली आहे. कारण हे अल्लाहचे मार्गदर्शन आहे. ’ एखाद्या अशा गोष्टीच्या मागे लागू नका जिचेे तुम्हाला ज्ञान नसेल. निश्चितच डोळे, कान व हृदय या सर्वांकडे जाब विचारला जाईल. (कुरआन : 17:36).
10) अहंकार व घमेंड : व्यक्ती, समाज, शासक यांच्यावर संकट येण्याचे मूळ कारण अहंकारात दडले आहे. पूर्वीचे राष्ट्र समाप्त झाले. थोर व्यक्ती लयास गेल्या म्हणून कुरआने स्पष्ट सांगितले आहे कि, पृथ्वीवर घमेंडीत चालू नका, तुम्ही पृथ्वीला फाडू शकत नाही किंवा पर्वताच्या उंचीला गाठू शकत नाही. (कुरआन 17:37)

-एम. एम. शेख

अल्लाहतआला, जो सर्वशक्तिमान आहे, जीवसृष्टीचा निर्माता आणि पालनकर्ता आहे. अल्लाहतआलाने या सृष्टीमध्ये अनेक जीवांची निर्मिती केली. जमिनीवर, आकाशात आणि समुद्रामध्ये- पशू, पक्षी, जलचर जीव इत्यादी. परंतु या संपूर्ण जीवांमध्ये मानवी जीवनाला सर्वश्रेष्ठत्व अल्लाहने प्रदान केले. मानवी जीवन एकदाच आहे. पुन्हा पुन्हा जीवन मिळत नाही, हे कुरआनने प्रभावासह स्पष्ट केले आहे. अशा अमूल्य मानवी जीवनासंबंधी कुरआनने अत्यंत स्पष्टपणे मार्गदर्शन केले आहे.

अल्लाहचे प्रेषित ह. मूसा (अ.) यांच्या जनसमूहाला संबोधन करून त्यांना आदेश देण्यात आला आहे.
‘‘ज्याने एखाद्याचा नाहक खून केला (त्या मृत व्यक्तीने एखाद्याचा खून किंवा पृथ्वीतलावर उपद्रव (फितना) माजविण्याचे कृत्य केले नव्हते तर त्याने (खून करणाऱ्याने) जणू समस्त मानवजातीला ठार मारले. आणि जर एखाद्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही समस्त मानवजातीला जीवन प्रदान केले.’’(दिव्य कुरआन, सूरह माइदा, आयत क्र. ३२)
मानववंश टिवूâन राहण्यासाठी एक दुसऱ्याच्या प्राणाचा आदर प्रत्येकाच्या मनात असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने एक दुसऱ्याच्या जीवनरक्षणाची भावना बाळगणे अत्यावश्यक आहे. जो कोणी अकारण एखाद्याची हत्या करतो तेव्हा तो फक्त एकावरच अत्याचार करीत नाही, तो खुनी दुसऱ्याची नाहक हत्या करून सिद्ध करतो की जीवनाच्या आदरसन्मानाने त्याचे हृदय रिक्त आहे. त्याला मानवी सहानुभूती नाही. म्हणूनच तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. नाहक हत्या करून तो समस्त मानवजातीविरूद्ध पाऊल उचलतो. खरे महत्त्व प्राणाची कदर आहे. मनुष्य हत्या करतो तेव्हा त्याच्या मनात मनुष्यप्राणाविषयी आदर शिल्लक राहत नाही. अशा अवस्थेतील मनुष्य संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरतो. अशा व्यक्तीमध्ये असलेला दुर्गुण इतर मानवांत येत असेल तर संपूर्ण मानवजात नष्ट होऊन जाईल. याविरूद्ध जो मनुष्य एखाद्या मानवाचा जीव वाचवितो, इतरांच्या जीवाचे रक्षण करतो, तो खरे तर समस्त मानवजातीचा आदर करणारा आहे. कारण त्यात जे वैशिष्ट्य सापडते त्यावरच मानवता टिकून आहे.
मानवामध्ये खुनशी वृत्ती का आणि कशी उद्भवते? याचे स्पष्टीकरण कुरआनने स्पष्टपणे उघड केले आहे. आद्य मानव ह. आदम (अ.) हे प्रथम प्रेषित होते. त्यांना दोन पुत्र होते. ‘तौरात’ ईशग्रंथात त्यांची नावे काईन (काबील) आणि हाबील आहेत. मानवजातीच्या आरंभकाळातील एका महत्त्वपूर्ण घटनेचा उल्लेख तौरात (बायबल) मध्ये आहे. परंतु त्यातील बोधप्रद भाग नाहीसा करण्यात आला आहे. दिव्य कुरआनने या घटनेचे काहीही उणेअधिक न करता वर्णन केले आहे, त्याच्या उद्दिष्टासह स्पष्ट केले आहे.
‘‘आणि जरा यांना आदम (अ.) च्या दोन मुलांची गोष्टदेखील पूर्णपणे ऐकवा. जेव्हा त्या दोघांनी (आदमपुत्रांनी) कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली. दुसऱ्याची स्वीकारली गेली नाही. त्याने सांगितले, ‘‘मी तुला ठार मारीन.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘अल्लाह तर पापभीरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो. जरी तू मला ठार मारण्यासाठी हात उचलशील तरी मी तुला ठार मारण्यासाठी हात उचलणार नाही.’’ मी समस्त विश्वांचा स्वामी, पालनकर्ता अल्लाहच्या प्रकोपाला भितो.’’ (कुरआन, सूरह माइदा, आयत २७)
काबीलच्या मनात मत्सर निर्माण झाला की हाबीलची कुर्बानी कशी स्वीकृत झाली व त्याची स्वत:ची कुर्बानी का स्वीकृत झाली नाही. या मत्सरापायीच त्याने आपल्या निरपराध भावाला ठार मारले. यावरून निष्पन्न होते की मत्सर असा भयंकर रोग आहे, जो माणसाला हत्येसारख्या घोर अपराधाकरिताही उद्युक्त करतो.
पृथ्वीवर हे पहिले मानवी रक्त होते जे जमिनीवर सांडले गेले होते. त्याच्या रक्तपाताच्या पापात, आदम (अ.) चा पहिला पुत्र सहभागी होतो, कारण तो पहिला मनुष्य आहे ज्याने हत्येची पद्धत प्रचलित केली. (हदीस : मुस्लिम किताबुल कसास)
कुरआनमध्ये या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करण्याचा मूळ उद्देश यहुदी लोकांच्या कटकारस्थानांवर सूक्ष्म दृष्टीने निंदा करणे आहे, जे त्यांनी इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांच्या प्रतिष्ठित सहाबा (सहकारी) यांना ठार मारण्यासाठी केले होते. (कुरआन, अध्याय ५, आयत ११)
आज जगात सर्वत्र द्वेष, मत्सर याचा मोठा पगडा रिवाज आहे. त्यामुळे क्षुल्लकशा कारणामुळे माणूस माणसाला ठार मारण्यासाठी उद्युक्त होत आहे. अशा लोकांची अत्यंत कठोर शब्दांत निर्भत्र्सना करीत कुरआन आदेश देतो की,
जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि पृथ्वीवर उपद्रव माजविण्याकरिता हिंसाचार माजवतात, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील, अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्पर विरूद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापले जातील अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल. हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्यासाठी याहून मोठी शिक्षा आहे.’’ (कुरआन, सूरह ५, आयत ३३)
शेवटी सर्वशक्तिमान अल्लाहकडे मी दुआ करतो की, समस्त मानवांना सुबुद्धी दे. एकमेकांच्या जीवनाचा आदर, रक्षण करण्याची सद्गती दे.
अल्लाहच्या आदेशानुसार (दिव्य कुरआन) आणि अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कृतिशील जीवनानुसार (सुन्नत) प्रत्येकाला जीवन जगण्याचे मार्गदर्शन प्राप्त होवो. द्वेष, मत्सर, हिंसाचारापासून मुक्तr मिळो. (आमीन)

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Theme images by 5ugarless. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget