इस्लामचा उगम

भूतलावर जेव्हापासून मानवी जीवनाची सुरुवात झाली, त्याच वेळी मनुष्यासाठी ‘इस्लाम’ चा आरंभ झाला. ‘इस्लाम’ चा अर्थ अल्लाहचे आज्ञापालन करणे आहे. इस्लाम मानवासाठी जन्मजात धर्म आहे. मनुष्यजातीचा निर्माणकर्ता आणि पालनकर्ता अल्लाहच आहे. मनुष्यांसाठी मुलभूत कर्तव्य हेच आहे की त्यांनी रचयिताचे आज्ञापालन करावे. अल्लाह पृथ्वीवर व प्रथम पुरुष हजरत आदम, पत्नी हव्वा (अ.) यांना अवतरविले. त्याच दिवसांपासून त्यांना आदेश दिला, की सर्वांची सर्वांगिण उन्नती केवळ माझ्या मार्गदर्शनाद्वारे जीवन व्यतीत करण्यात लाभेल. माझ्या आज्ञेचे पालन करा. ज्या गोष्टीची मी मनाई करतो त्यापासून दूर रहा. यावर तुम्ही अंमलबजावणी केली तर बक्षिसास पात्र व्हाल. विरुद्ध वर्तन केले तर माझा क्रोध व अप्रसन्नता लाभेल. हाच ‘इस्लाम’ चा उगम आहे.
पिता आदम व माता हव्वा यांनी हिच शिकवण आपल्या संततीस दिली. काही काळ यांवर लोक दृढ राहीले. नंतर असे लोक जन्मास आले ज्यांनी आपल्या निर्माणकर्ता अल्लाहची अवज्ञा केली. कांही लोकांनी एक अल्लाहच्या अस्तित्वामध्ये वा गुणामध्ये अन्य भागिदार नेमले. कोणी स्वतःच भगवान झाला. कोणी म्हणाला जीवन माझ्या परीनं आवडीनं जगण्यास मी स्वतंत्र आहे. माझ्या इच्छेप्रमाणे मी करीन, ईश्वराचे जे काही हुकुम असतील ते असोत पण मी मात्र माझ्या मनाप्रमाणे करीन. त्या हुकुमांना जुमानणार नाही. अशा पद्धतीने जगात कुफ्र (नकार देणे) ची उत्पत्ती झाली. याचाच अर्थ आहे, ‘‘एक अल्लाहशिवाय अन्य भिन्न भिन्न ईश्वर मानणे.’’
ज्यावेळी कुफ्र (एक अल्लाहस नकार देणे) वृद्धींगत होत गेला त्यामुळे जमिनीवर जुलुम, दंगे, हिसाचार, गुन्हे वाढत गेले. त्यावेळी अल्लाह ने आपल्या सद्वर्तनी दासांना या दुवर्तनी लोकांना समज देण्यास नियुक्त केले. त्यांना एकेश्वरवादाच्या सन्मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यास नेमले. हे सज्जन दास प्रेषित (पैगंबर) म्हटले गेलेत. प्रेषितांचा क्रम थोड्या थोड्या अंतराने तर कधी दीर्घ मुदतीनं जगाच्या निरनिराळ्या भूभागात, वंशात अंमलात आला. हे सर्व प्रेषित सत्यवादी, श्रद्धाधारक व सज्जन लोक होते. सर्व प्रेषितांनी एकाच धर्माची हाकं दिली. हाच इस्लाम होय. निश्चितच आपण नुह, इब्राहीम, मुसा व येशु यांची नावं ऐकलीत, हे सर्व एक अल्लाहचे पैगंबर आहेत. शिवाय हजारोच्या संख्येने प्रेषित होऊन गेलीत. गत हजारो वर्षाच्या इतिहासात हेच घडलं की जेव्हा अनेकेश्वरवाद (बहुदेववाद) वाढत गेला त्या त्या वेळी प्रेषित नियुक्त होत गेले. प्रेषितांनी लोकांना अनेकेश्वरवादापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. इस्लाम स्वीकारण्याची हांक दिली. काही लोकांनी इस्लामचा स्वीकार केला. काही लोक आपल्या अनेकेश्वरवादाच्या श्रद्धेतच राहीले. ज्यानी इस्लाम स्वीकार केला, ते ‘मुस्लिम’ होत. याच लोकांनी प्रेषिताद्वारे उच्चतम् नितीमत्ता स्वीकारली व आदर्श चारित्र्य जोपासण्याचा प्रसार केला. नंतर असं पण घडलं की या मुस्लिमांची पिढी ‘इस्लाम’ विसरुन कुफ्र (बहुदेववादी) च्या तावडीत सापडली. क्रमशः तद्नंतर पुढील प्रेषितांनी परत इस्लामची बीजं पुन्हा रोवली. हा क्रम वर्षानुवर्षे चालत राहीला. इस्लाम श्रद्धेत ताजं व्हायचं परत श्रद्धेत कोमोजुन जायचं. अल्लाहने सरतेशेवटी अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना नेमलं. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामचा संदेश असा पुनरुज्जीवीत केला जो आजपर्यंत ताजातवाना आहे, कायम आहे. अल्लाहच्या इच्छेनुसार इस्लामचा संदेश पृथ्वीच्या अंतापर्यंत दृढ राहील.
प्रेषित मुहम्मद (स.) १४७५ वर्षापुर्वी अरबस्थानात प्रसिद्ध शहर मक्केत जन्मले. त्याकाळी अरबस्थानाच काय, जगात कुठंही इस्लामचं अस्तित्व राहीलं नव्हतं. पुर्वीच्या प्रेषितांच्या शिकवणीचे थोडंफारं परिणाम सद्गुणी लोकांत आढळून येत. परंतु शुद्ध स्वरुपात एक ईश्वराची शुद्ध श्रद्धा भूतलावर आढळून येत नसे. या कारणास्तव लोकांचे जीवन चारित्र्यहीन होते. एक ईश्वरास विसरुन लोकं विभिन्न विशुद्ध धर्मात भोगी होते. या परिस्थितीत मुहम्मद (स.) जन्मले. वयाच्या चाळीस वर्षापर्यंत मक्का येथे शांत, एकांत, जीवन व्यतीत केलं. मक्कावासी आपणास सत्यवादी व प्रामाणिकपणामुळे प्रतिष्ठा देत असे. कोणी पण हे जाणू शकत नव्हतं की हीच व्यक्ती भविष्यात महान मार्गदर्शक बनणारी होती. प्रेषित मुहम्मद (स.) जगाच्या या बिघडलेल्या स्थितीस पाहून हळहळत. स्तब्ध होत. यापासून मानव समाज मुक्त होण्यास मार्ग काय? जगातील हा विध्वंस कसा संपेल? वयाच्या चाळीसाव्या वर्षी अल्लाहने मुहम्मद (स.) यांना प्रेषित नियुक्त केले. प्रथमतः सभोवतालच्या समाजास, तद्नंतर जगात अखिल मानवतेसाठी कुफ्र (अनेकेश्वरवाद) पासून अलिप्त होऊन इस्लाम (एकेश्वरवाद) स्वीकारण्यास मार्गदर्शन करणे, ही जबाबदारी मिळाल्यानं मक्केतील लोकांना स्पष्ट सांगणं सुरु केलं की एक अल्लाह शिवाय अन्य कोणाचीही भक्ति करु नका. तुम्हा सर्वांचा स्वामी व निर्माता केवळ एक अल्लाह आहे. त्या एकमेव अस्तित्वाचीच पुजा करावी, त्या एकमेव अल्लाहच्या आदेशाचं पालन करावं सर्वसाधारण लोकांनी विरोध केला. मुहम्मद (स.) यांचा आवाज बंद करण्याचा सर्वतोपरीने प्रयत्न केला. पण समाजातील प्रामाणिक व सद्गुणी लोकांनी हळूहळू मुहम्मद (स.) यांची साथ दिली. मक्केच्या बाहेर अरबस्थानातील विविध ठिकाणी इस्लामची शिकवण पोहोचु लागली. तेथे पण असेच घडले, अज्ञानी लोकांनी विरोध केला, सुजाण व खुल्या मनाच्या लोकांनी इस्लामच्या प्राकृतिक शिकवणींवर विश्वास ठेवला. मक्का शहरी तेरा वर्षे हा क्रम सातत्याने लोकांसमोर प्रस्तुत झाला. एकीकडे साऱ्या भूभागात हा संदेश पोहोचत होता आणि लोक इस्लामचा स्वीकार करत होते. तर दुसरीकडे अज्ञानी लोकांनी तीव्र विरोध केला व मुस्लिमांचा छळ सुरु केला. अंततः मक्का शहरातील सरदारांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठार मारण्याचा कट केला. रात्रीची वेळ निवडली, तद्नंतर कदाचित मुस्लिम संपून जातील. अशी घटकासमोर येऊन ठेपली. अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) व मुस्लिमांना मक्केतुन मदिनेस स्थलांतर करण्याचा आदेश दिला. मदिनेत अनेक लोकांनी इस्लामचा स्वीकार केला होता. इस्लामसाठी त्याग करण्यास त्यांची तयार होती. त्या रात्री प्रेषित मुहम्मद (स.) मक्केहून मदिनेस रवाना झाले. ह्या घटनेस ‘हिजरत’ म्हणतात. याच्या स्मरणार्थ ‘हिजरी’ सना ची सुरुवात झाली.
प्रेषित मुहम्मद (स.) मदिनेस पोहोचल्यानंतर अरबस्थानाच्या कानाकोपऱ्यातुन मुस्लिम मदिनेस येऊ लागले. येथे तत्वतः इस्लामी राजवट स्थापन झाली. इस्लामचे विरोधक संतप्त झाले आणि विचार केला की ज्यावेळी मुसलमान विखुरलेले होते त्यांना संपविणं सोपे होते. परंतु आता मुसलमान एके ठिकाणी एकवटले, त्यांची सत्ता स्थापन झाली, आता यांना जर उसंत मिळाली तर एक प्रबळ शक्ती निर्माण होईल, म्हणून लवकरात लवकर असा प्रयत्न करणं अगत्याचं आहे की त्यांच्यावर आक्रमण करुन त्यांना संपवावं. या विचारानं मक्काच्या सरदारांनी प्रेषित मुहंमद (स.) च्या विरुद्ध युद्ध छेडलं, अरबच्या अन्य साथीदारांना इस्लाम विरुद्ध एकत्रित केलं. परिणामतः ते मुहमंद (स.) चा पराजय करु शकले नाही. इस्लामचा प्रसार रोखू शकले नाही. निकराचा विरोध करुन देखील इस्लामचा प्रचार प्रसार वाढू लागला. विरोधकामधून अनेक चांगली माणसं इस्लामकडे आकर्षित जाली. आठच वर्षात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का काबीज केलं. मक्केच्या यशामुळे साऱ्या अरबस्थानात कुफ्र (अनेकेश्वरवाद) ची कंबर तुटली. तद्नंतर एक वर्षाच्या अल्पकाळात अरबस्थान इस्लाममय झाले. बारा लक्ष चौरस मैलापर्यंत शक्तिसाली इस्लामी राष्ट्र उदयास आलं. ज्यात सत्ताधिश ‘‘अल्लाह’’ आहे. शरीयतचे कायदे आहे, व्यवस्था अल्लाहच्या दासाकडे आहे. या राजवटीत जुलुम, अत्याचार, अनैतिकतेस थारा नव्हता. चोहीकडे शांती, समाधान, न्याय, कल्याण, प्रामाणिकता होती. अल्लाहच्या आज्ञापालनामुळे लोकांमध्ये उत्तम नैतिक चारित्र्य निर्माण झाले होते. २३ वर्षाच्या अल्पकाळात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरबस्थानात अमुलाग्र बदल घडविला. अरब भूभागच केवळ इस्लाममय झाला असे नसुन साऱ्या जगात इस्लामची पताका घेऊन उभे राहीले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या दैदिप्यमान यशानंतर वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
तद्नंतर मुहम्मद (स.) यांच्या सहकाऱ्यानी हे काम सांभाळले, ज्या कार्यासाठी मुहम्मद (स.) यांनी भूतलावर प्रयत्न केला. ह्या कतृत्ववान सहकाऱ्यानी इस्लामची शिकवण अखिल जगात पसरविली. प्रतिकार करणाऱ्यांचा बिमोड केला. हा प्रवाह कोणी थोपवु शकला नाही. अल्पकाळात सिधपासून स्पेनपर्यंत पसरले. परिणामतः विशाल लोकसमुहाने इस्लामचा स्वीकार केला. जेथे जेथे पोहोचले, अन्याय आणि अनैतिकता नाहीशी झाली. अल्लाहच्या विद्रोहींना अल्लाहचे अधीन बनविले. क्रुर व रानटी लोकांना ज्ञानाचा प्रकाश दिला. अमानवीय कृती करणाऱ्यांना नैतिक आदर्शाच्या कळसावर पोहोचवले. क्रुर सत्ताधिकाऱ्यांना नमविले. न्यायनिवाड्याचा असा आदर्श समोर ठेवला ज्याची इतिहासात तुलना नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सहकाऱ्यानी अल्लाह कडून अवतरित झालेल्या पवित्र कुरआन मुखोद्गत केले. शब्द न शब्द पाठ केला. लिहून ठेवलं व कायमस्वरुपी सुरक्षित केले. सुरक्षित ठेवण्यास घेण्यात आलेली काळजी, ही अल्लाहकडून हमी आहे. पवित्र कुरआनचे शब्द न शब्द त्याचप्रमाणे आहेत जे चौदाशे वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद (स.) वर अल्लाहकडून अवतरले. यात कानामात्रा अनुस्वारचा कमी अधिकपणा नाही. दुसरे महान कार्य जे सहकाऱ्यानी केले, त्यात प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्र, उक्ति-कृती, वचने, कथनं, आज्ञा, शिकवणी, जागोगाजी पवित्र कुरआन आदेशाचे स्पष्टीकरण, आदर्श नैतिकता, संवयी अशी प्रत्येक गोष्ट व तपशीलवार विवरण पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित केली. यामुळे जगात नंतर प्रत्येक काळात लोकांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीस जणु काही समोर पाहात आहोत असे अनुभवले. चौदाशे वर्षानंतर देखिल अल्लाहचा आज्ञाधारक दास कसा असावा जो अल्लाहच्या प्रसन्नतेस पात्र होता ते माहीत होते. ह्या दोन गोष्टीद्वारे अर्थात पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांचे चरित्र सुरक्षित असल्याने ‘इस्लाम’ जगात सदासर्वदा सुरक्षित झाला.
प्रेषित मुहम्मद (स.) पूर्वी ‘इस्लाम’ त्या पूर्वीच्या प्रेषिताद्वारे होत असे, तदनंतरच्या प्रेषितांच्या मरणोत्तर लोक त्यांना विसरत असत. त्या लोकांनी देखील अल्लाहच्या आज्ञा व त्यावेळच्या प्रेषितांची चारित्रं सांभाळली नाहीत. त्यामुळे पुढील पिढ्यां हापाठ विसरत जात असे. परंतु आता अल्लाहची वाणी ‘पवित्र कुरआन’ व प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्र हे सुरक्षित, शाबुत आहेत. या कारणास्तव ‘इस्लाम’ सदैव सुरक्षित झाला आहे. कुरआन व हदीस (पैगंबर वचनं) द्वारा इस्लाम सदैव ताजंतवानं, सुरक्षित आहे. या कारणास्तव आता जगाला नवीन प्रेषितांची आवश्यकता राहीली नाही. ‘इस्लाम’ समजण्यासाठी असे लोक भरपुर आहेत जे कुरआन व मुहम्मद (स.) यांचे गाढे अभ्यासक आहेत, त्यासाठी ते जीवन अर्पण करतात. प्रत्येक आदेशावर कृती (अंमलबजावणी) करतात व लोकांना त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी प्रवृत्त करतात.
[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Theme images by 5ugarless. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget